बारराव कोळयांचा किल्ला
मौजे पेढांबे, खडपोली आणि कळकवणे यांचे सीमा मध्यावर १५०० फुट उंचीवरील डोंगरावर बारराव कोळीयांचा बाकई किल्ला आहे. किल्ला स्वयंपूर्ण असून त्याचे जीर्णतर अवशेष अद्यावत दिसून येतात. दारुगोळा कोठारे, तळी, विहीरी यंत्रे असून गवती व शेती जमीनही विपूल आहे. तटावरुन उड्या मारुन सती गलेल्या बारराव कोळ्यांचे स्त्रियांच्या जागेस सतीचा कडा म्हणतात. किल्ल्यावर घोड्यावरुन जाण्यास पुरातन पायवाट आहेत. वरती वेताळ बुरुज आहे. येथून श्री क्षेत्र परशुराम, दाभोळ खाडी, किल्ले अंजन वेल, गोवळकोट, तिव्ररे घाट आणि कुंभारली आदी दुर्बीणीने पहिल्यास स्पष्ट दिसतात. त्यावरुन बारराव कोळ्यांनी आपले निवासस्थानी किल्ला किती धूर्तपणे बांधला होता त्याची कल्पना येते.
बारवई किल्ल्याच्या पायथ्याशी वैतरणा नदीकांठी मौजे दसपटी पेढांबे हे गाव असून त्याची भावबंधी पेढांबे, खडपोली, कळकवणे या गावात असून त्या सर्वांस पेढांबकर असेच म्हटले जाते. पेढांबे येथे दसपटीचे वडील घराणे असल्या कारणाने मानपान, न्याय मनसुबी वगैरे आदी अधिकार त्यांचेकडेच होते आजवर त्यांचा बहुमान राखला जातो हे विशेष होय, कोणत्याही प्रकरणी न्याय. मनसुबा करीता चिट्टया करणे व न्याय मनसुबी चालवीणे व ते आमलात आणणे वगैरे पेढांबकरच करीत असत श्रीरामवरदायीने कुलस्वामिनीच्या उत्सवकार्यप्रसंगी निमंत्रणे मात्र नांदवीसकर हे हिंदू धर्मशास्त्रकरुप वडीलकीचे नात्याने पेढांबकर म्हणून करीतात.